जळगाव, दि.०७प्रतिनिधी – हवामान बदलासह मानवनिर्मित आपत्तींमुळे शेती ही न परवडणारी होत आहे, ही नकारात्मकता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास बदलू शकते, मागील काही वर्षात शेतीमध्ये खूपच बदल झाले आहेत, यातून भारताचे विकसीत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) हे आधुनिक कृषीक्षेत्राचे ‘पॉवर ऑफ हाऊस’ म्हणून पुढे येत आहे असा सुर उद्योजक प्रतिनिधी, शेतकरी व फाली मधील विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादात उमटला. जैन हिल्स येथे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया च्या १२ व्या वार्षिक अधिवेशनातील अंतिम टप्प्याची आज सुरवात झाली. शिवार फेरीत टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जैन हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी,…
Author: तापी दर्पण
मुंबई-( प्रतिनिधी) – मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये…
मुंबई-(प्रतिनिधी)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था, नवोपक्रम आणि उद्योजकतेचा नवा वेग’ या विषयावर आधारित या मुलाखतीत राज्याच्या स्टार्टअप धोरणांपासून ते जागतिक स्तरावरील संधींपर्यंत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार ९ जून 2026 रोजी रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमातून देखील प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदिका डॉ.मृण्मयी भाजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप इकोसिस्टीम रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत कायम राखलेले…
फालीच्या इन्व्होशन सादरीकरणात मुंबई तर बिझनेस प्लॅनमध्ये बारामतीची शाळा प्रथम जळगाव- (प्रतिनिधी): “शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हा माझा खरा पुरस्कार आहे,” असे माझे वडील श्रद्धेय मोठेभाऊ नेहमी सांगत होते. त्यांचा विचारांचा वारसा पुढे नेत, “आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि तेज पाहून भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीच्या याच विद्यार्थ्यांमधून घडतील, असा मला विश्वास वाटतो,” असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फाली (FALI) उपक्रमातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शुक्रवारी केले. त्यांच्या हस्ते फालीच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्स पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. जैन तंत्रज्ञानामुळे देशाच्या निर्यातील केळी फळ प्रथम जैन…
जळगाव-(जिमाका)- जळगाव येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया ३० जून २०२६ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. जळगाव शहर तसेच जिल्ह्यातील जवळील तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व युद्ध विधवांच्या मुलांना, माजी सैनिक विधवांच्या मुलांना तसेच सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहात निःशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार असून अतिरिक्त जागा उपलब्ध असल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांनाही प्रवेश दिला जाईल. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, शारीरिक प्रशिक्षण, सोलर प्रणालीद्वारे गरम पाण्याची…
जळगाव- (जिमाका) —: भारतीय टपाल विभागामार्फत ग्राहकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्यासाठी ८ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ज्या तक्रारींचे संबंधित कार्यालयाकडे सादर केल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर प्राप्त झालेले नाही, अशा तक्रारी डाक अदालतमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक, मनी ऑर्डर आदी सेवांशी संबंधित तक्रारींची सुनावणी करण्यात येईल. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती आवश्यक तपशीलांसह, मूळ तक्रारीची तारीख तसेच ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार पाठविण्यात आली होती त्यांचे नाव व पदनाम नमूद…
जळगाव- (जिमाका ) : अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने धडक कारवाई करत विविध ठिकाणांहून भेसळीचा संशय असलेले तसेच मानकांबाह्य अन्नपदार्थ आणि शीतपेयांचा सुमारे २ लाख ३१ हजार ६६० रुपयांचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी भडगाव रोडवरील बांबरुळ फाटा, लोहटार (ता. पाचोरा) येथील एका उत्पादक पेढीची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी उत्पादित लस्सीच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समूह क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. तसेच भेसळीचा संशय असल्याने लस्सीचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. यावेळी २०० मिली क्षमतेची ७५० पॅकेट्स, किंमत २२ हजार ५०० रुपये,…
शासनाने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या पाहिजे, या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी दि. ४ व ५ जून २०२६ रोजी यावल तालुक्यातील लंगडाआंबा, जामन्या, गारया व उसमळी या दुर्गम आदिवासी गावांना भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच विविध विकासकामे, शासकीय योजना आणि मूलभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. दि. ४ जून रोजी जामन्या येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या प्रांगणात पंचक्रोशीतील सुमारे १०० ते १२५ ग्रामस्थांच्या उपस्थितीत जनसंवाद / चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी रेशन धान्य वितरण, आरोग्य सुविधा, रस्ते,…
जळगाव-(जिमाका ) : महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास अथवा त्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यात व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमची ३३ पथके तसेच फ्लाइंग स्क्वॉडची ३३ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत जिल्हाभर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने…
जळगाव- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात आर्थिक वर्षात १६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत…